बुलडाणा : कथा-कादंबऱ्या वाचणं आम्ही केव्हाच सोडलं आहे. आता माझं बालवाङ्मय वाचण्याचं वयही राहिलेलं नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. ( There is no age left to read children’s literature, says Chief Minister on Sanjay Raut’s book)बुलडाणा येथे ‘भाजपच्या जिल्हा कार्यालयाचा भूमिपूजन सोहळाही फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत काही दावे करण्यात आले आहेत. अजून काही लिहिलं असतं, तर धमाका झाला असता. हाहाकार माजला असता असे राऊत म्हणाले होते. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, कथा-कादंबऱ्या वाचणं आम्ही केव्हाच सोडलं आहे. आता माझं बालवाङ्मय वाचण्याचं वयही राहिलेलं नाही. अशा गोष्टींवर फार गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही. संजय राऊत यांच्याबाबत ते कोण आहेत? मोठे नेते आहेत का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवण्यात येतील. काही अपवादात्मक ठिकाणी वेगळ्या भूमिका असतील, तरी त्या परस्पर समन्वयातून ठरवण्यात येतील. याबाबत आपण गुरूवारीच काही बाबी स्पष्ट केल्या आहेत.पोलिसांच्या कर्जाबाबत (डीजी लोन ) मुख्यमंत्री म्हणाले, पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना डीजी कार्यालयाच्या शिफारशीनुसार मिळणाऱ्या कर्जासाठी आवश्यक परवानगी दिल्या गेल्या आहे. हा विषय मार्गी लागला आहे.
