उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे, राज ठाकरेंशी युतीवरून रामदास कदम यांचा निशाणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत. राज ठाकरे काहीही बोलत नाही. मुंबईत 12 टक्के मराठी माणूस शिल्लक आहे. महापालिका कशी गळ्यात घालता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत, असा निशाणा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी साधला आहे. ( Uddhav Thackeray stands with a begging bowl Ramdas Kadam targets him for his alliance with Raj Thackeray)

तसेच मुंबईतील सावली बार प्रकरणावर रामदास कदम यांनी भाष्य केलं. ठाकरे गटाचे अनिल परब यांनी खोटी माहिती दिली. रामदास कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी डान्सबार कधीही चालवले नाही. आम्ही लोकांचे संसार उद्धवस्त केले नाही, तर आम्ही लोकांचे संसार वाचवले. आमचं डान्सबार असल्याचं सांगत अनिल परब विधानसभेत खोटी माहिती देतायत. मी त्यांचा निषेध करतो, असंही रामदास कदम यांनी सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शीत झाला. यावर बोलताना कदम म्हणाले, संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनी मुलाखत घेणं म्हणजे उंदराला मांजर साक्ष, असं आहे. उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलंय. दिल्लीत हॉटेल लीलामध्ये काय काय झालं, हे उद्धव ठाकरेंना विचारा. मला सगळं माहितीय, मीही सांगेन.

उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला धोंडा म्हणत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नको नको ते म्हणायचं आणि पुन्हा पंतप्रधानांच्या पाया पडत मला वाचवा. माझ्या मुलाला दिशा सालियन प्रकरणातून वाचवा, असं म्हणायचं, अशी टीका त्यांनी केली.

मांजर डोळे मिटून दूध पिते ते सगळ्यांना दिसते. आम्हाला भाजपमध्ये घ्या…आमची तयारी आहे. एकनाथ शिंदेंचं राजकारण संपवा, म्हणजे मी भाजपमध्ये येतो, अशा अटी आणि शर्ती टाकण्याचं काम उद्धव ठाकरेंकडून सुरु आहे, असा दावाही रामदास कदम यांनी केला. , असा टोलाही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *