स्वाभिमान शोधून दाखवा… इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना शेवटच्या रांगेत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना शेवटच्या रांगेत बसविल्याचा प्रकार घडला आहे. यावरून स्वाभिमान शोधून दाखवा अशी बोचरी टीका भाजपने केली आहे. तर काँग्रेसने तुमची काय अवस्था करून ठेवलीय असा टोला शिंदे गटाने लगावला आहे.
( Find your self-respect and show it Uddhav and Aditya Thackeray in the last row at the India Aghadi meeting)

हे महाराष्ट्रातील तिन्ही नेते शेवटच्या रांगेत बसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हा फोटो सत्ताधाऱ्यांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात येत आहे. या फोटोत स्वाभिमान शोधून दाखवा #शेवटची_रांग अशी टीका भाजपने केली आहे. शिवसेना शिंदे गटानेही यावरून ठाकरेंना डिवचले आहे.

उद्धव ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंनी गुरुवारी इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत त्यांना शेवटच्या रांगेत बसविल्याचा फोटो समोर आला आहे.

भाजपा महाराष्ट्र आणि शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी इंडि आघाडीच्या बैठकीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे महाराष्ट्रातील तिन्ही नेते शेवटच्या रांगेत बसल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटोला गोल करन “या फोटोत स्वाभिमान शोधून दाखवा #शेवटची_रांग” असे कॅप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे आता या फोटोला इतर सत्ताधारी सुद्धा सोशल मीडियावर शेअर करू लागले आहेत.

भाजपा महाराष्ट्रासोबत शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनीही हे फोटो पोस्ट केले आहेत. त्याशिवाय त्यांनी पोस्ट करत लिहिले आहे की, “आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे… #शिवरायांचा वारसा सांगता ना रे… खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे????” असा टोला म्हस्केंनी कवितेच्या माध्यमातून लगावला आहे. तर, “#बाळासाहेबांनी आम्हाला #आत्मसन्मान #स्वाभिमान शिकवला अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला.. तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे??” असा प्रश्नही म्हस्केंनी उपस्थित केला आहे.

“#काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे, आदित्य ठाकरे…. तुमच्यापेक्षा एकेक खासदारवाले पक्ष बरे त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे… #महाराष्ट्राची #दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे… थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा ना रे… महाराष्ट्राची किंमत #कोणी कुठे वाढवली, ते जरा दुसऱ्या फोटोंत बघा रे…..” असे टीकास्त्र नरेश म्हस्केंनी डागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *