पाकिस्तानात हिरो आणि भारतात झिरो, पाकिस्तानी माध्यमांतील बातम्या दाखवत एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई :लष्कराच्या पराक्रमावर त्यांना शाबासकी देणे सोडून त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करत आहेत. किती नुकसान झाले हे विचारत आहेत. देशात राहून पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. हे करून का तुम्हाला पाकिस्तान-ए-इशारे मिळणार आहे का? पाकिस्तानमध्ये तुम्ही हिरो तर देशात झीरो झाले आहात. हे देशप्रेम नाही तर देशद्रोह आहे. बाळासाहेब असते तर अशा सगळ्यांचा कोर्ट मार्शलच केला असता, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केला. ( Hero in Pakistan and Zero in India, Eknath Shinde’s attack while showing news from Pakistani media)

शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यांच्या पाकिस्तानमध्ये केलेल्या बातम्याही दाखवत शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. लष्करावर आणि पंतप्रधान मंत्र्यांवर त्यांना विश्वास नाही, पण त्यांना पाकिस्तानच्या अध्यक्षांवर विश्वास आहे. संपूर्ण भारतीय जनतेला ऑपरेशन सिंदूर आणि लष्करी सेनेबद्दल अभिमान आहे. बाळासाहेब असते तर मुक्तकंठाने त्यांनी शाबासकी दिली असती, पण ही कद्रू माणसे आरोपाशिवाय करणार तरी काय? असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, वाघाचं कातडं पांघरून कुणीही वाघ होत नाही. त्याला मनगटात जोर लागतो. आणि तोंडात दम असून चालत नाही तर मनगटात दम लागतो. तो फक्त आमच्या शिवसेनेत आहे. अडीच वर्षाआधीच तुमचे टांगा पलटी घोडे फरार केले आम्ही. त्यामुळे तुम्ही आमच्या नादाला लागू नका. धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीतला हा एकनाथ शिंदे आहे. आम्ही कुणाला छेडत नाही आणि आम्हाला कुणी छेडल तर आम्ही त्याला सोडत नाही. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकले होते, तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे गेले होते.अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे आणि कलम 370 हटवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. मग ही कामे कुणी केली. तरीही विरोध का करताय?

आपल्याकडे आत्मविश्वास आहे तर त्यांच्याकडे अहंकार आहे. आत्मविशावास आपल्याला विकासाकडे नेतोय आणि त्यांचा अहंकार त्यांना विनाशाकडे घेऊन जात असल्याचे आपणास दिसतेय. काँग्रेस दावणीला शिवसेना बांधण्याचे पाप कुणी केले, हे आपल्याला माहिती आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कंबरेचे लोक्याला गुंडाळले. शिवसेनेच्या मतदारांशी, बाळासाहेबांशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी त्यांनी विश्वासघात केला.

सरडा रंग बदलतो पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील महाराष्ट्राने पाहिलाय, हे मी नाही तर त्यांचेच सगेसोयरे आणि भाऊबंद सांगत आहेत. बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण विचार सोडले नाहीत. विचारांसाठी बाळासाहेबांनी सत्तेलाही लाथ मारली. तर दुसरीकडे, बाळासाहेबांचे वारसदार म्हणणारे त्यांच्या विचारांना धुळीस मिळवले. बाळासाहेब असते तर त्यांना मिरचीची धूर दिली असती, अशी टीका त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *