आता बिहारमध्ये महाराष्ट्राची बदनामी, मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : परदेशात जाऊन देशाची बदनामी करणारे आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. पण यांना ना परदेशात कोणी विचारले, ना बिहारमध्ये कोणी विचारेल. जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली, तीच परिस्थिती बिहारमध्ये होणार आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली.
( Now Maharashtras Image Maligned in Bihar CM Attacks Rahul Gandhi)

मुंबईत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आपला भाऊ, देवा भाऊ या कार्यक्रमात ते बोलत होते. लाडकी बहीण योजना ही ५ वर्ष कोणीही बंद करणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

जगाच्या पाठीवर अमेरिका, युरोप, जपान, कोरिया ज्या देशांनी विकास केला त्या देशाच्या लोकसंख्येतील ५० टक्के सहभाग महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तीत करून देशाच्या मुख्यधारेत, अर्थव्यवस्थेत आणण्यात आले. तसे केल्यास देशाच्या विकासाची गती दुपटीने वाढेल. यामुळे ते विकसित अर्थव्यवस्थेकडे गेले तसेच मोठ्या प्रमाणात विकसित झाले. आता तीच भारताची वाटचाल सुरू झाली आहे. पुढच्या २० वर्षात भारत जगातील पहिली किंवा दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. यामध्ये तुमची भागीदारी महत्त्वाची असणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *