उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना ऑफर दिली आणि अंगावर टीकेचे मोहोळ उडवून घेतले. राज ठाकरे महाविकास आघाडीत येथील का असे राऊत यांना विचारले आणि प्रकाश आंबेडकरांचा संदर्भ त्यांनी दिला. यावर ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले हे तर लवंडे आहेत. कधीही लवंडतील.
राज ठाकरे जर मविआसोबत आले तर घेणार का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला, त्यावर संजय राऊत म्हणाले होते प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते आले. यावर राज ठाकरे म्हणाले, यांच्याकडे कोण जाईल, मुळात आताचे लवंडे कधी कुठे लवंडतील माहिती नाही. यांचा काही भरवसा आहे का? कोण जाईल यांच्याकडे? इंडीय आघाडीत नितीश कुमारही होते, कुठे गेले? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.राज ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली, शिर्डी, नगरचे पदाधिकारी येऊन गेलेत. पुढे ठरवू काय करणार. अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्या अशी मागणी पक्षातून होते आहे.
कुठे का निवडणूक लढवावी याबाबत चाचपणी करत आहोत. सत्ताधारी पक्षही चाचपणी करत आहेत, आम्हीही करतोय,ठाकरे म्हणालेटोलला विरोध नाही, मात्र टोलचे पैसे कुठे जातात ते बघितलं पाहिजे. टोलचा पैसा पक्ष निधीसाठी वापरला जातो. राम मंदिरामुळे भाजपला मतदान होईल असं नाही प्रत्येक निवडणूक वेगळी असते, ठोकताळे मांडता येत नाही. 1992 ला बाबरी , बॉम्बस्फोट या पार्श्वभूमीवर निवडणूक झाली होती. 2014 वेगळे कारण होते. आता राम मंदिर झाल्याचे समाधान आहे पण भाजपला मतदान करतील असे नाही पक्षातील कार्यकर्त्यांना इंजेक्शन दिलंआमचा कारभार उघडा आहे, त्यामुळे गटबाजी दिसून येते, निवडणूक आल्यावर इतर पक्षातील तडे दिसतील. मी काल इंजेक्शन दिले आहे, कितीमध्ये फरक पडतो ते बघू, असं राज ठाकरे म्हणाले.
मनोज जरांगेंचं आता उपोषण का? मी मागेच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली तेव्हा सांगितले होते असे होणार नाही.कोर्टात प्रकरण जाणार कोणीतरी राजकीय दृष्टीने मोर्चे घेऊन येतात, मराठा बांधव जातात. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर विजय उत्सव साजरा केला आता का उपोषण करतात?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.मी जे बोलतो ते कडवट वाटते नंतर ते कळतं सत्य आहे. माझा टोलला विरोध नाही. टोल वसुलीवर जी कॅश घेतली जाते, त्याला विरोध, त्यामध्ये स्पष्टता नाही. विषय टोल नाही टोल वसुली आहे. पैसे भरून झाले की नाही हे कधी कळेल? मुंबई पुणे हायवेवर किती पैसे वसूल झाले? मुख्यमंत्र्यांना भेटून त्याचे प्रेझेंटेशन दाखवत आकडेवारी ठेवणार आहे. पैसे टोलवाल्याच्या खिशात जात आहे. किंवा त्याच्या खिशातील पैसे राजकीय पक्षाच्या फंडात जाणार हे चालेल का? खड्डे जर असतील तर टोल कशासाठी? कोकणचा रस्ता पूर्ण नाही तरी तिथे एक टोल. ट्रान्स हार्बर रोडवर चांगले कॅमेरे, मग टोलवर कॅमेरे बसवा माणूस कशाला पाहिजे ? राज्य सरकार आणि खाजगी माणसाच्या खिशात पैसे जातात हे बघायला पाहिजे.
