विशेष प्रतिनिधी
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकहितासाठी कठोर प्रशासक म्हणून कसे काम करत आहेत याचा किस्सा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितला आहे. (Agriculture Minister Manikrao Kokate has told the story of how Chief Minister Devendra Fadnavis is working as a strict administrator for public welfare.)
डिपार्टमेंटचं काम शिस्तीत झालं पाहिजे माझ्यासह तुमच्या कुणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल, असा दम पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दिला होता, असा गौप्यस्फोट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला आहे.
कोकाटे एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना म्हणाले, पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला. माझ्यासह तुमच्या कुणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. डिपार्टमेंटचं काम शिस्तीत झालं पाहिजे. 100 दिवसांचा कार्यक्रम दिला. आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या हातात काहीच राहिलं नाही. त्यामुळे आम्हाला काम करावंच लागेल. पण आपणही नीट काम करा. म्हणजे सरकार आणि आपली सांगड बसली पाहिजे. त्यामुळे समाजात एकप्रकारचं स्थैर्य निर्माण होईल.
खतं आणि औषधाच्या लिंकिंगमुळे शेतकरी हैराण झालं आहेत. रासायनिक शेतीकडे जाण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. मार्केट कमिट्यांमध्ये बोर्ड लावा. बाजार भाव सांगा. नशिबाने आम्ही सगळे एका विचारांचे आहोत. मी गेल्यावर लोक विचारतात की सोयाबीन अजून गेलं नाही. जनतेच्या मनात पण संभ्रम आहे की कोणाला काय सांगावं, असंही त्यांनी सांगितलं.
कोकाटे पत्रकारांशी राजीनामा देणार की नाही याबाबत म्हणाले, जे काही कायदेशीर आहे, ते बघू. मी पात्र आहे की अपात्र आहे, ते बघू.
