विशेष प्रतिनिधी
मुंबई : पालिका निवडणुकीतील जागा वाटपाच्या वाटाघाटी वेळी पक्षाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना केले. ( The partys self-respect will not be compromised in forming an alliance: Eknath Shindes assertion)
शिंदे म्हणाले, कोण कोणाशी युती करतंय त्याची चिंता करू नका. त्यांची सर्व गणितं आपल्यापकडे आहेत, पालिका निवडणूक जिंकण्याच्या निश्चयाने दसरा मेळाव्यात गर्दी करा. विचार, विकास आणि विश्वास’ या त्रिसूत्रानुसार कामाला लागून मुंबई महापालिका जिंकण्याचा उद्देश ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. महापालिका निवडणुकीची कमान शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांवर असेल, त्यामुळे नेमणुका बाकी असल्यास त्या तातडीने पूर्ण करा.
एकनाथ शिंदे म्हणाले, पूर भागात मंत्र्यांचे दौरे झाले. आता खासदार, आमदार, पदाधिकारी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बांधावर जातील. संकट दिसले की मदतीला धावून जा, तो खरा शिवसैनिक. निमंत्रणाची वाट बघू नका. हा पक्ष नोकर आणि मालकाचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्याचा आह. शिस्त ही शिस्त आहे. ‘शिवसेना’या अक्षरांना गालबोट लागता कामा नये.
