सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंसमोर किंवा अंबादास दानवेंकडे जाऊन रडावं अजित पवारांचा सुषमा अंधारेंना टोला

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुषमा अंधारे हे नाव विविध कारणाने आणि वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आहे मग साधुसंतांच्या विरोधातील वक्तव्य असो किंवा भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांवर खालच्या पातळीची टीका करणे असो सुषमा अंधारे नेहमी चर्चेत असतात

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात सुषमा अंधारे बोलत होत्या. इथे राजकारणाचा विषय नाही अश्लाघ्य पद्धतीने जेव्हा आमदार माझ्यावर टीका करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही, मला अपेक्षित होतं सर, सभागृहात आपण सगळे विरोधी पक्ष म्हणून बाकावर बसतो. तक्रार का लिहून घेतली नाही? खरे की खोटं? पब्लिक डोमेनमध्ये सगळा कंटेंट आहे. तरीसुद्धा सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता, असं म्हणत सुषमा अंधारे भावनिक झाल्या माझं काही चुकत असेल तर कान पकडा मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे. कारण मी आपल्याकडे हक्काने बोललंच पाहिजे. आता जे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते शिंदे गटाचे आहेत, जे बायकांबद्दल इतक्या अश्लाघ्य पद्धतीने बोलतात. या सगळ्या लोकांना ज्यांच्यामध्ये प्रचंड मनुवादी दृष्टीकोन वाढलेला आहे. यांना सत्तेवरुन खाली खेचायचं असेल तर महाविकास आघाडी असायला हवं. महाविकास आघाडी असेल तर तुम्ही असायला हवं. तुम्ही आहात तर ती मोट बांधून आहे, म्हणून तुम्ही असायला हवं,” असे सुषमा अंधारे शरद पवार यांना उद्देषून म्हणाल्या.

अजित पवार संतापले आणि म्हणाले कि सुषमा अंधारे ह्या ठाकरे गटात आहेत.अंबादास दानवे यांच्याकडे विधानपरिषदचे विरोधीपक्षनेते पद आहे. शरद पवार यांच्यासमोर रडण्यापेक्षा सुषमा अंधारे ज्या पक्षाकरता बाबा रे, काका रे, मामा रे करत आहेत त्यांनी अजित पवारचा उल्लेख करण्यापेक्षा त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे सांगितले पाहिजे. जेवढा विधानसभेच्या विरोधी पक्षाला अधिकार आहे तेवढाच विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याला आहे. त्यांना आपल्यामार्फत सांगा की, तिथं रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंसमोर रडला असता आणि अंबादास दानवेंसमोर प्रश्न उपस्थित केला असता तर जास्त योग्य झालं असतं,” असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.