१५ महिने, १८ स्मरणपत्र, एका फाईलीची कथा…!



कोरोनाच्या काळात मविआ सरकारने केलेल्या भ्रष्टाचारावर नुकतेच माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश पाडला. विधानसभेच्या सत्राच्या शेवटच्या दिवशी त्यांनी सरकारचा कारभार सगळ्यांसमोर मांडला यावेळेला कोरोनाच्या काळात सरकारने औषधी संबंधीच्या फाईल गहाळ करत जो भ्रष्टाचार केला तो फडणवीस यांनी सगळ्यांसमोर मांडला. यावेळी त्यांनी दावा केला कि, वजन ठेवल्या शिवाय फाईल हलत नाही, अशी परिस्थिती या सरकारची आहे.

ते म्हणाले कि, “या महाराष्ट्र सरकारचा कारभार बघा, वजन ठेवल्या शिवाय इथे फाइल हलत नाही. कोरोनाच्या काळात सप्टेंबर २०२० मध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने गरीबांसाठी ७३ औषध खरेदीची फाइल महापौरांकडे मान्यतेसाठी गेली. मे २०२१ पर्यंत १८ स्मरणपत्रे गेली, आणि त्यानंतर कार्यालयाने सांगितले कि फाईल गहाळ झाली. त्यानंतर पुन्हा एक फाइल तयार झाली. आणि ती नोव्हेंबर २०२१ मध्ये म्हणजे तब्बल १५ महिन्यांनी दुसरी फाईल मान्यतेसाठी आली. या काळात कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली होती. या सर्व परिस्थितीत गरीबांसाठी ना कुठले औषधी खरेदी करण्यात आले, ना काही काम केले गेले, उलट लोक कोरोनाने मरत होते.” असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.



“विशेष उपायुक्त आरोग्य उपायुक्त यांची समिती गठित करण्याचा निर्णय घेतल्या गेला. त्याचा अहवाल १४ दिवसात येणार होता, जो अद्याप आलेला नाही, फाईल गहाळ झाल्याची इथे तक्रार देखील नाही. आता ही फाईल कुणाची वाट पहात होती हे काही मी वेगळ्यानी सांगायची आवश्यकता नाही.” असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला चिमटा काढला.

“सर्वात श्रीमंत महापालिका, मुंबई महापालिका इथे काय परिस्थिती आहे ते बघा, इंजेक्शन आणि सर्वसाधारण लसी जुलई २०२१ मध्ये कारार संपला नवीन निविदा अद्याप काढण्यात आली नाही, त्यामुळे नागरिकांना खाजगीतून खरेदी करावी लागत आहेत. असेच शेड्युल २ आणि शेड्युल ३, ५,८ ,९ च्या औषधांसोबत, सर्जिकल आणि लॅब उपकरणांबाबतही झाले आहे. निविदा सतत प्रलंबित राहत आहेत, निविदा निघाल्याच नाहीयेत.

“महानगर पालिकेला रस चौकांच्या सजावटीत आहे, पेंग्विन मध्ये आहे, प्राणी संग्रहालयात आहे. ते करायला हवं, मात्र पहिली प्राथमिकता कशाला द्यायला हवी हे सुद्धा सरकारला कळू नये, त्याचवेळी महानगरपालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या गरीब माणसाला, या कोरोनाच्या काळात आपण काहीच उपलब्ध करून देणार नसू तर काय परिस्थिती निर्माण होईल?” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

एकूणत सराकारच्या भ्रष्टाचाराच्या कथा एक एक करून फडणवीस बाहेर काढत आहेत. यामुळे आता पुढे काय होतं? हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.