गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच हवामानातील बदलामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. गेल्या 7 आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कालच्या तुलनेत आजही देशात कोरोनाचा एक नवीन रुग्ण नोंदवण्यात आला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1590 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात सध्या 1956 सक्रिय रुग्ण आढळले असून काल दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
शनिवारी राज्यात 437 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 242 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरातील असून पुण्यात 571 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मुंबई, ठाण्याचा क्रमांक आहे. राज्यात कोरोनाच्या दोन मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. राज्यात एकूण 242 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 79,91, 066 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.15 टक्के इतकं झालं आहे. राज्यात दोन कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णाांची एकूण संख्या 81,41, 457 इतकी झाली आहे.
