विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरचा दणका बसल्यावर पाकिस्तानने भारताचा बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांची सुटका केली आहे. कॉन्स्टेबल पूर्णम बुधवारी सकाळी १०:३० वाजता अटारी-वाघा सीमेवरून भारतात परतले. डीजीएमओ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर २० दिवसांनी त्यांना सोडण्यात आले. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. चौकशीनंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. (
Indian BSF jawan Purnam Kumar Shaw released by Pakistan after Operation Sindoor)
बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, पूर्णम शॉ २३ एप्रिल रोजी फिरोजपूर सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर असताना चुकून पाकिस्तानला गेले होते. यानंतर त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांचे दोन फोटो प्रसिद्ध केले होते. पहिल्या फोटोत पूर्णम एका झाडाखाली उभे होते. त्यांची रायफल, पाण्याची बाटली आणि बॅग जमिनीवर पडलेली होती. दुसऱ्या फोटोमध्ये सैनिकाच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती.
जवान शॉ हे मूळचे पश्चिम बंगालमधील हुगळी येथील रिसदा गावचे रहिवासी आहेत. २३ एप्रिल रोजी ते फिरोजपूरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर शेतकऱ्यांसोबत ड्युटीवर होते. या दरम्यान, ते चुकून पाकिस्तानी सीमेत घुसले आणि एका झाडाखाली बसले. जिथे पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना पकडले .
श्रीनगरमधील बीएसएफची २४ वी बटालियन फिरोजपूरच्या ममदोट सेक्टरमध्ये तैनात होती. २३ एप्रिल रोजी सकाळी, शेतकरी गहू कापण्यासाठी त्याच्या कंबाईन मशीनसह शेतात गेले. हे शेत भारत-पाक सीमेवरील कुंपणावरील गेट क्रमांक २०८/१ जवळ होते. शेतकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत दोन बीएसएफ सैनिकही होते. यावेळी सैनिक पीके शॉ यांची प्रकृती बिघडली. ते झाडाखाली बसायला गेले. झाड सीमेपलीकडे होते. त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना घेरले आणि पकडले आणि त्यांची शस्त्रेही हिसकावून घेतली.
जवान पीके शॉ पाकिस्तानी रेंजर्सनी पकडल्याची बातमी बीएसएफच्या उच्च अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाकिस्तानी रेंजर्सशी चर्चा सुरू केली. त्यांना सांगण्यात आले आहे की या सैनिकाची काही दिवसांपूर्वी बदली झाली होती. त्याला शून्य रेषेबद्दल माहिती नव्हती. त्याने चुकून शून्य रेषा ओलांडली. त्याला सोडण्याची विनंती करण्यात आली. पण, पाकिस्तानी रेंजर्सनी नकार दिला.
सैनिक पीके शॉ यांच्या सुटकेसाठी भारताकडून ध्वज बैठकींच्या माध्यमातून सतत प्रयत्न केले जात होते. याबाबत दोन ते तीन ध्वज बैठकाही झाल्या पण सैनिकाच्या सुटकेचा प्रश्न सुटू शकला नाही. तत्कालीन बीएसएफचे महासंचालक (डीजी) दलजितसिंग चौधरी यांनीही केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्याशी याबाबत चर्चा केली होती परंतु हे प्रकरण सुटू शकले नाही.
२८ एप्रिल रोजी बीएसएफ जवानाची गर्भवती पत्नी रजनी पश्चिम बंगालहून फिरोजपूरला पोहोचली. जिथे त्यांनी बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. ती फिरोजपूरमध्ये २ दिवस राहिली. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना परत पाठवण्यात आले.
ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यावर चर्चा सुरु झाली आहे. त्यावेळी पाकिस्तानने हा निर्णय घेतला.
