विशेष प्रतिनिधी
मुंबई : पहलगाम हल्ला आणि त्यानंतर झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच एक नवं व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ( Who exactly won and who lost Raj Thackerays rebuke on India-Pakistan match)
राज ठाकरेंच्या या व्यंगचित्रात पहलगामधील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले नागरिक दाखवण्यात आले आहेत. याबरोबरच गृहमंत्री अमित शहा तसेच आययीसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनाही दाखवण्यात आलं आहे. या व्यंगचित्रात जय शहा ‘अरे बाबांनो उठा आपण जिंकलो पाकिस्तान हरले’ असं म्हणत आहेत. तर नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हे व्यंगचित्र शेअर केलं आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
