जम्मू-काश्मीरमध्ये 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 35 वर्षांतील सर्वाधिक मतदान झाले आहे. संपूर्ण केंद्रशासित प्रदेशातील (5 लोकसभा जागा) मतदान केंद्रांवर एकत्रित मतदानाची टक्केवारी 58.46% होती. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचा सक्रिय सहभाग हा केंद्रशासित प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी एक मोठा सकारात्मक संकेत असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. हे निकाल जम्मू-काश्मीरमधील राजकीय स्थिरता आणि लोकशाहीवरील विश्वास दर्शवतात. यामुळे लोकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे, हेही स्पष्ट होते.
2019 पासून निवडणूक लढविणार्या उमेदवारांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.पाच लोकसभा जागांसह संपूर्ण केंद्रशासित प्रदेशातील केंद्रांवर एकूण 58.46 टक्के मतदान झाले असल्याचे आयोगाने सांगितले. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरमध्ये मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. निवडणूक आयोग लवकरच केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करेल, असे कुमार यांनी सांगितले.
काश्मीर खोऱ्यातील अधिक तरुणांनी विश्वास दाखवून लोकशाहीचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला आहे.18-59 वयोगटातील मतदारांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. काश्मीरमधील अधिक मतदानाची टक्केवारी त्यांच्या लोकशाहीवरील विश्वासाचे प्रतिबिंब आहे, जो एक सकारात्मक आणि आनंददायक विकास आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये 18-59 वयोगटातील 80 टक्के मतदारांनी मतदान केले, असे आयोगाने सांगितले.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची उच्च टक्केवारी म्हणजे लोकशाहीवरील त्यांच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे, जी एक सकारात्मक आणि उत्साहवर्धक घडामोड आहे. दिल्ली, जम्मू आणि उधमपूर अशा विविध ठिकाणी मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्या काश्मिरी स्थलांतरित मतदारांना देखील आयोगाने नामांकित विशेष मतदान केंद्रांवर मतदान करण्याची किंवा टपाल मतदानाच्या सुविधेचा वापर करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. जम्मूमध्ये 21, उधमपूरमध्ये 1 आणि दिल्लीत 4 विशेष मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या क्षेत्रात स्वीपचा एक भाग म्हणून जागरुकता आणि संपर्कासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मतदानविषयक संदेशांचा प्रसार करण्यासाठी क्रीडा स्पर्धा, चर्चासत्रे, जागरुकता मेळावे, पथनाट्ये आणि इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले.
